पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात असून, पात्र उमेदवारांची शिफारस केल्यानंतरही शिक्षकांच्या तब्बल १० हजारांवर जागा रिक्त राहिल्या आहेत. यातील मुलाखतीशिवाय पदभरतीच्या तब्बल ५ हजार ७१४ जागा रिक्त राहिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवाडीनुसार एकूण २१ हजार ६७८ पैकी मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ पदे होती. त्यातील ११०८५ उमेदवारांची शिफारस झाली, तर ५ हजार ७१७ पदांसाठी शिफारस झालेली नाही. आरक्षणाचा विचार करता माजी सैनिक (१५ टक्के) उमेदवार नसल्यामुळे २ हजार ३५७ जागा व अंशकालीन (१० टक्के) उमेदवार नसल्यामुळे १ हजार ५३६ जागा तसेच खेळाडू (५ टक्के) उमेदवार नसल्यामुळे ५६८ जागा रिक्त राहिल्या आहेत.
झाल्यास भरतीच्या शेवटी दुसरी फेरी
घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार
मुलाखतीशिवाय जाहिरातीतील रिक्त
जागा भरल्या जातील. मुलाखतीसह
या प्रकारातील एकूण ४ हजार ८७९
मुलाखती- शिवाय भरतीच्या हजार ७१४ रिक्तच ५ जागा
शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवाडीनुसार, भाषा विषयाचा विचार करता पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यम १५८५, मराठी माध्यम ८७०, उर्दू माध्यम ६४० जागा व सहावी ते आठवी गटातील गणित-विज्ञान २२३८ जागा रिक्त राहिल्या आहेत. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानुसार मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी १:१ या प्रमाणात उमदेवार देण्यासाठी व्यवस्थापननिहाय त्यांच्या
जाहिरातीतील पदे विचारात घेऊन गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवार उपलब्ध न झाल्याने पहिल्या फेरीमध्ये समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न
जागांची मुलाखतीसाठी शिफारस करण्याची कार्यवाही सुरू आहे. १:३ ऐवजी १:१० या प्रमाणात उमेदवार देण्याबाबत शासन आदेश व न्यायालयीन प्रक्रिया विचारात घेऊन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार शासनपत्र २१ फेब्रुवारी २०२४ नुसार नियमावलीमध्ये सुधारणा होईपर्यंत १:१० या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या ११८९ संस्थांना ४८७९ रिक्त पदांसाठी योग्य ती प्रक्रिया करून १:१० या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जातील. मुलाखती शिवाय पदभरतीसाठी १:१ या प्रकारात निवडलेले उमेदवार वगळून अन्य उमेदवारांमधून मुलाखतीसह पदभरती पर्याय निवडलेल्या संस्थांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या आधारे निवड केली जाईल. यासाठी ३० गुणांची तरतूद
पडताळणीनंतर नियुक्ती
गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी राज्यस्तरावरून वेळापत्रक ठरवून दिले जाईल. त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर योग्य ते वेळापत्रक तयार करून पदस्थापनेपर्यंतची कार्यवाही केली जाईल. त्यामध्ये दिव्यांग व महिलांना प्राधान्य दिले जाईल. मूळ कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्ती देण्याची कार्यवाही केली जाईल, असेही शिक्षण
विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
केली असून, उमेदवारांची निवड
संस्था करणार आहे.

No comments:
Post a Comment